कृषीताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्रहवामान
Trending

अर्धापूर परिसरात वादळी वाऱ्याने केळी पिकांचे मोठे नुकसान

केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

द फ्रेम न्यूज

नांदेड दि 11: अर्धापूर तालुक्यात व परिसरातील गावात सोमवार (दि.9) सायंकाळपासून आलेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

पिके मुळांसह उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी नुकतेच केळी बागांमध्ये खर्च केलेला असल्याने ही नैसर्गिक आपत्ती त्यांच्यासाठी मोठा आघात ठरली आहे.सावरगाव येथे जगन्नाथ शंकरराव आबादार यांच्या शेतावर काल झालेली अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे झालेले नुकसान सहाय्यक कृषी अधिकारी कोमल प्रकाशराव कांबळे यांनी पाहणी केली.

यावर शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker