२१ वर्षानंतर जमला शाळेतील आठवणींचा मळा; न्यू हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेतील तेव्हाचे प्रत्येक क्षण आठवत शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

छत्रपती संभाजी नगर | हर्सूल येथील न्यू हायस्कूलच्या २००३-४ वर्षाच्या इयत्ता दहावीतील वर्ग मित्र मैत्रिणीचे स्नेहसंमेलन तब्बल २१ वर्षानंतर स्नेहसंमेलन रविवारी (दि.१) उत्साहात आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेतील तेव्हाचे प्रत्येक क्षण आठवत शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
प्रतिकूल परिस्थिती शाळेत शिक्षण घेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले करिअर घडवले. कोणतीही शिकवणी नसताना शाळेत शिक्षकांनी प्रचंड मेहनतीने प्रत्येकाला शिकवून दहावी उत्तीर्ण केले. त्यांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी न्यू हायस्कूलच्या २००३-४ वर्षाच्या इयत्ता दहावीतील वर्ग मित्र मैत्रिणी तब्बल २१ वर्षानंतर या स्नेहसम्मेलनात आपापल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक अनिल गुंजाळ यांनी तर सूत्रसंचालन सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक राजू कहाटे, शिक्षक विक्रम शिंदे, पोपटराव पोकळे, श्रीमती राजगुरू, श्रीमती येवले यांचा माजी विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सत्कार केला. शाळेत एकत्र बसून मधल्या सुट्टीत खाल्लेला डब्बा, अभ्यास न केल्याने शिक्षकांकडून मिळालेली शिक्षा, आणि यामुळे परिस्थितीशी जुळवत मिळालेले यश विद्यार्थ्यांनी डोळ्यांच्या कडा पाणावत सांगितले. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांची मुले-मुली शिकवून न्यू हायस्कूलच्या प्रत्येक शिक्षकांनी सर्व विद्यार्थी सक्षम बनवली. याचा सार्थ अभिमान यावेळी वर्गमित्र-मैत्रिणीनी व्यक्त केला. यावेळी रंजना हरणे, सुषमा औताडे, सचिन दुबे, अजीम मिर्झा, सुनील मोटे, स्वप्नील जाधव, संदीप औताडे, रामेश्वर माळशिखरे यांनी शाळेतील आठवणी सांगितल्या. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी गोरख औताडे, संदीप औताडे, लक्ष्मण हरणे, अमोल नरवडे, सचिन दुबे, विष्णू औताडे, पंढरीनाथ वाणी, प्रदीप पल्हाळ, ज्ञानेश्वरी सावंत, मीना गुंजाळ यांनी पुढाकार घेतला.
फुल हार रांगोळ्यांनी विद्यार्थ्यांचे केले स्वागत*प्रारंभी छत्रपती सभागृह येथे सर्व २००३-४ इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांकडून शिक्षक विक्रम शिंदे यांनी विद्यार्थ्यांची प्रार्थना, प्रतिज्ञा तसेच राष्ट्रगीत घेऊन वर्ग प्रवेश केला. शाळेच्या वतीने आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे फुल हार रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आले. तेव्हाचे वर्गशिक्षकानी सर्वांची हजेरी घेऊन सर्व विद्यार्थ्यांना सूचना केल्या. पुन्हा वर्गातील शिकवणीचा तास आणि ते दिवस आठवून स्नेहमेळाव्यात प्रत्येकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.