आंतरराष्ट्रीयक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन
Trending

'इ साला कप नाम दे'

विराट कोहलीला सुद्धा भावना अनावर झाल्या आणि त्याला भर मैदानात त्याला अश्रू अनावर झाले.

अहमदाबाद: मंगळवार रात्री अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर संपूर्ण वातावरण आरसीबीमुळे झालं होतं.आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासात तब्बल १८ वर्षानंतर प्रथम विजय मिळवला आहे. बंगळूरू नये प्रथम फलंदाजी करत वीस षटकात नऊ बाद १९० धावा केल्या होत्या पंजाबला २० षटकात नऊ बाद १८४ धावावर रोखत सहा धावांनी विजय मिळवला आहे आयपीएल च्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आयपीएल करंडक आला विराट स्पर्श केला.

अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी २९ धावांची गरज होती शशांक सिंगने एकाकी लढत देत मात्र त्याला दुसऱ्या बाजूकडून अपेक्षित साथ मिळाली नाही पंजाबच्या एका मागोमाग विकी पडत गेल्या आणि त्याच्या हातातून करंडकही निसटून गेला शेवटच्या षटकाचा पहिला फुलटॉस शशांक शॉट चुकवला दुसऱ्या चेंडूवर ही धाव निघाली नाही आणि अख्ख्या स्टेडियम मध्ये आरसीबीचा जल्लोष सुरू झाला होता. तब्बल १८ सतरांपासून राहिलेल्या विजेते पदाचा दुष्काळ ही संपवला. आयपीएलचा अंतिम सामना रोमहर्षक झाला आणि बेंगळूरू ने पहिले विजेतेपद साकारले. खुद विराट कोहलीला सुद्धा भावना अनावर झाल्या आणि त्याला भर मैदानात त्याला अश्रू अनावर झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker