महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन उत्साहात साजरा
मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन पत्रकारांचा सन्मान

द फ्रेम न्यूज
परिसंवादातून वक्त्यांनी मांडली परखड मते ; राज्यभरातील पत्रकार मान्यवरांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर | दि. १५ : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी नगरच्या वतीने आयोजत रौप्य महोत्सवी अधिवेशन रविवारी (दि.१५) संत एकनाथ रंग मंदिरात उत्साहात पार पडले. या अधिवेशनाचे उदघाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते राज्यभरातील कर्तुत्वान व्यक्तींना “मराठवाडा भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. “माध्यमांचा डीएनए कोणता? या परिसंवादातून विविध पत्रकार वक्त्यांनी आपली परखड मत मांडून पत्रकारितेची भूमिका विषद केली.

यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, डिजिटल मिडिया चे अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. छबुराव ताके, महराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदीप कवाडे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय केणेकर, जेष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, महापौर नंदकुमार घोडेले, माजी अध्यक्ष वसंत मुंढे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, एबीपी माझा च्या संपादिका सरिता कौशिक, पत्रकार अश्विनी डोके, अविनाश वानखेडे यांची उपस्थिती होती. यावेळी अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी मंत्री अतुल सावे म्हणाले कि, राजकारणात असतांना मला रोजच पत्रकारांशी संवाद साधावा लागतो. प्रत्येक शब्द जबाबदारीने बोलण्यासाठी आमचे प्राधान्य असते. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून पत्रकारितेची ओळख आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला रोज पेपर वाचनाची सवय लावली त्यांचे तेच संस्कार घेऊन आज माझ्या मुलांसोबत सकाळीच पेपर वाचतो. पत्रकारांनी केलेले वार्ताकन आमच्या ज्ञानात नेहमीच भर घालणारे असल्याने भारतीय माध्यम क्षेत्र अधिक सक्षम झाले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी मंत्री सावे यांनी व्यक्त केली. तर मराठवाडा भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले कि, गेली चाळीस वर्ष मी राजकारणात आहे आज मंत्री पदापर्यंत पोहोचण्यासाठी मी जेवढी मेहनत घेतली तेवढीच मेहनत हि माझ्या आयुष्यात पत्रकारांची आहे. काही माध्यम चुकीची बातमी देऊन मिळवलेले यश दुर्लक्षित करतात. मात्र माझ त्यांना सांगणे आहे कि, चाळीस वर्ष राजकारण करतांना प्रचंड कष्ट करावे लागले. मंत्री पद सहज नाही मिळाले त्यामुळे पत्रकारांनी आमच्यातील चांगल्या गोष्टीचाही विचार बातमी देतांना करावा. असे सांगत मंत्री शिरसाट यांनी महराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, आमदार संजय केणेकर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी तर सूत्रसंचालन संजय शिंदे व वैभव स्वामी यांनी केले तर समारोप डॉ. विश्वास आरोटे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणीचे राज्य समन्वयक नितीन शिंदे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाखडा, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, निवड समिती प्रमुख रुपेश पाडमुख तसेच सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी…*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी नगरच्या वतीने रौप्य महोत्सवी अधिवेशनात मराठवाडा भूषण पुरस्काराने मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, चंद्रसेन कोठावळे, जयंती कठाळे, अभिनेता योगेश शिरसाट, प्रशांत गिरी, अशोक देशमाने, शेख मुजीब, अरुण पवार, हनुमंत भोंडवे, मधुकर अन्ना वैद्य, जयप्रकाश दगडे, सचिन चपळगावकर, शिवराज बिचेवार, अशा शेरखाने, कटके, गणेश गायकवाड, प्रशांत गिरे, सुनिल देवरा, बी. एस. स्वामी, मधुकर सावंत, राजेंद्रसिंह सूर्यवंशी आदींचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार…
दशरथ चव्हाण – नवी मुंबई, दत्ता घाडगे- अहिल्यानगर, भगवान चंदे – ठाणे, राजेंद्र कोरडे पाटील – सोलापूर, स्वामीराज गायकवाड, नयन मोंढे – अमरावती, राकेश खराडे – रायगड, किशोर रायसाकडा- जळगाव, जितेंद्र सिंह राजपूत – उत्तर महाराष्ट्र, नितीन शिंदे – पश्चिम महाराष्ट्र, चंद्रकांत पाटील- कोल्हापूर, संतोष पडवळ- ठाणे शहर, संजय फुलसुंदर, राहुल फुंद- शिर्डी, गणेश सुरजसे- अकोला, अनुप कुमार भार्गव- वर्धा, लक्ष्मण डोळस – नाशिक, निलेश सोमानी- वाशिम विदर्भ, दत्तात्रय राऊत – जामखेड आदींना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष देविदास कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष जे.इ. भांबर्डे, मराठवाडा सल्लागार विलास इंगळे, सहसचिव मनोज पाटणी, सचिव महेंद्र डेंगळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, संपर्क प्रमुख सुजित ताजने, सहसचिव रवींद्र लांडगे, ज्ञानेश्वर तांबे, संताराम मगर, आनंद अंभोरे, माधव खिल्लारे यांनी पुढाकार घेतला. तसेच गोपालजी पटेल, लक्ष्मीनारायणजी राठी, राजू परदेशी आदीचे सहकार्य लाभले.